कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सव पार पडत आहे. राज्यभरात यंदा कोरोनाच्या सावटामुळे सण, उत्सवांवर बंधन असल्यानं काहीसा उत्साह कमी असला तरी भाविक शक्य तसे मनोभावे हे उत्सव साजरे करत आहेत. या काळात आदिशक्तींची पूजा देशभरात केली जाते.
महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, वणी आणि माहूर या साडेतीनशक्तिपीठांमध्ये पारंपरिक पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील लाखो भाविक देवीचे मनोभावे दर्शन घेत असतात. मात्र या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिरे उघडलेली नाहीत. या उत्सव काळात देवींचे सर्व धार्मिक विधी पार पडणार असल्याचे देवस्थान समितींमार्फत असून भाविकांना देवींचे दरवर्षीप्रमाणे दर्शन घेता येणार नाही. मंदिर व्यवस्थापनांनी भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करून दिली आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करवीरनिवासिनी अंबाबाईची विविध रूपात पूजा बांधली जाते. या रूपानं पौराणिक महत्व देखील असते. तर देवीची मंदिर परिसरात निघणारी पालखी हे खास वैशिष्ट्य असतं. यंदा भक्तांना मंदिरात जात येत नसलं तरी हे सर्व धार्मिक विधी इतर ऑनलाईन माध्यमातून पाहता येणार आहेत. आज नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस आहे. यानिमित्ताने अंबाबाईची आज श्रीकरवीरमाहात्म्यातील पन्नागालयावरील म्हणजेच पन्हाळ्यावरील नागांना दर्शन या रूपात नेत्रदीपक पूजा बांधण्यात आली आहे.
पहा फोटो –



महत्वाच्या बातम्या
- ‘आइटम’ हा सर्रास वापरला जाणारा शब्द आहे,यामध्ये अपमानजनक काय आहे?
- फडणवीस बिहारला जातात, त्यांनी दिल्लीला जावं पंतप्रधान घराबाहेर पडतील : ठाकरे
- केंद्र सरकार हे देशाचं सरकार, मोदींनी फोन करून विचारपूस केल्यावर पटलं
- संकट कायम : राज्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा
- ‘बाबा तुम्ही आता आराम करा, तुमचा लेक धनंजय मुंडे तुमच्या पुढच्या वाऱ्या करत जाईन’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

