Share

केंद्र सरकार हे देशाचं सरकार, मोदींनी फोन करून विचारपूस केल्यावर पटलं

Published On: 

सोलापूर : राज्यात परतीच्या पावसाने धुमशान माजवल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाताशी आलेल्या सोन्यासारख्या पिकासह शेतातील मातीदेखील वाहून गेल्याने शेतकरी मायबाप हतबल झाले आहेत. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून लवकरात लवकर सरसकट मागणी करावी अशी मागणी देखील केली आहे.

विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापुरच्या अक्कलकोट तालुक्यातील काही नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील कार्यवाहीची माहिती दिली आहे.

‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, त्याने काही मागण्यापूर्वी आम्ही मदत करु’ असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. मी कोणतीही घोषणा केली नाही, हे करु ते करु, सांगितलेलं नाही. आधी अंदाज घेऊ, माहिती घेऊ आणि जे करायचं ते करु असं त्यांनी सांगितलं आहे. तर, सद्या पंचनामे सुरु आहे, त्यानंतर प्रत्यक्ष मदत करू असा धीर त्यांनी दिला आहे.

केंद्राकडून मदत घेणार !

केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही, ते देशाचं सरकार आहे, त्यामुळे केंद्र सरकारने कोणताही दुजाभाव न करता महाराष्ट्राला मदत करावी. गरज असताना केंद्राकडे मदत मागितली तर गैर काय? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून विचारपूस केल्याने केंद्राकडे हक्काने मदत मागणार. मोदींना जाणीव आहे, त्यांनी राज्याला सर्वोतोपरी आश्वासन दिलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!