🕒 1 min read
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेत एकनाथ शिंदे गटातील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी अल्पमतात आली असल्याचा दावा करत यावर राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासंदर्भातील पत्र पाठवले असून सरकारला उद्या (गुरुवारी) बहुमत सिद्ध करायचे आहे. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले आहे.
राज्यपालांनी या प्रकरणावर घेतलेली भूमिका खेदजनक आहे. शिवसेनेने आपला गटनेता बदलला आहे. मग उद्या विधानसभेत कुणाचा व्हीप लागू होईल? राज्यपाल विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत वेगळी भूमिका घेतात. मग काल रात्रीतून असं काय घडलं? बहुमत सिद्ध करण्यासाठी ४८ तासांची मुदत देत अशा पद्धतीचे आदेश राज्यपालांनी का काढावेत? हा चमत्कार आहे. असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान शिवसेनेने बहुमताच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सदरील आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde : आसाम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी बंडखोर आमदार देणार ५१ लाख रुपयांची मदत
- IND vs IRE : ‘हा’ वेगवान गोलंदाज आयर्लंड विरुद्धच्या दोन सामन्यात ‘झिरो’वरून झाला ‘हिरो’, वाचा!
- IND vs IRE : जोडी जबरदस्त..! हुडा-सॅमसननं रचला नवा इतिहास; रोहित-राहुलला टाकलं मागे!
- Gulabrao Patil : “संजय राऊतांना ३०२, तडीपार माहित नाही, हे बाळासाहेबांचा फोटो…” ; गुलाबराव पाटलांची टीका
- Ananya : “‘इच्छा, धैर्य, शौर्य…” ; अनन्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रतिकने केले हृताचे कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
