🕒 1 min read
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsigh Koshyari) यांनी दिलेल्या निर्णयाने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. कारण, या निवडीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा होता. आता राज्यपालांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. यावरुन आता विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे.
विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची (BJP) भूमिका आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर (Cabinet Meeting) आता पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोशारी (Bhagat Singh Koshyari) पत्र पाठवण्यात आले आहे, अशी माहिती देत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेत्यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना आज पुन्हा पत्र पाठवण्यात आले आहे. यावर अजूनतरी राज्यपालांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. ‘जर राज्यपालांची पत्रावर प्रतिक्रिया आली नाही, तर संविधानिक पद्धतीने जे काही आम्हाला करता येणे शक्य आहे, ते सगळं काही आम्ही करु. त्याचप्रमाणे राज्यपालांच्या आडून विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची भूमिका आहे’, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल आणि उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस असून अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नाही, नाना पटोले यांनी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांनी घेतला खरपूस समाचार
- राज्यपालांचा महाविकास आघाडीला धक्का; आवाजी मतदानाला विरोध
- गोपीचंद पडळकरांवरील हल्ल्याप्रकरणी अजित पवार-फडणवीसांमध्ये रंगला सामना
- ‘या’ विषारी वृत्तीला लवकर अटक करा; जितेंद्र आव्हाडांची मागणी
- मविआ सरकार प्रत्येक विषयात घालत असलेल्या गोंधळावर पीएचडी करता येईल- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
