Share

“ईसापूर धरणाला ‘अद्यक्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक जलाशय’ नाव द्या”, पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Bjp Mla Gopichand Padalkar) यांनी यवतमाळ व हिंगोली जिल्ह्यातील अप्पर पैनगंगा प्रकल्प ईसापूर धरणास (Isapur Dam) अद्यक्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक जलाशय असे नाव देण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Udhav Thackrey) यांच्याकडे केली आहे. याबाबत पडळकरांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

पत्रात गोपीचंद पडळकर म्हणतात, सुभेदार मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेतलेल्या “आद्यक्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक यांनी शेतकरी व कष्टकरी रयतेच्या हिताचे राज्य चालवले होते. त्यांनी ८ जानेवारी १८१९ से ३१ जानेवारी १८१९ असा २३ दिवस न्हावा ता. हदगाव, जि.नांदेड येथे स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा दिला होता तसेच ३१ जानेवारी १८१९ नंतर कळमनुरी तालुक्यातील किल्ले वडगाव व उमरखेड पर्यंत संपूर्ण पैनगंगा नदीच्या खोऱ्यात वास्तव करून सतत स्वातंत्र्याचा लढा लढला. ईसापूर धरण ता. पुसद, जि. यवतमाळ या ठिकाणी त्यांचे काही वर्षे वास्तव्य होते.

त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी देशासाठी शेतकऱ्यांसाठी, कष्टकरी रयतेसाठी केलेल्या त्याग विचारात घेऊन व त्यांच्या इतिहासाची पुढच्या पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी ईसापुर धरणाचे “आद्यक्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक जलाशय” असे नामकरण करण्यात यावे, ही विनंती. असे पत्र गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!