औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात औरंगाबाद दौऱ्यावर आले असता एक लक्ष्यवेधी मागणी केली आहे. सचिन खरात म्हणाले की जगात प्रसिद्ध असलेल्या गौतम बुद्ध यांच्या अजंठा वेरूळ या लेण्या आहेत त्यामुळे औरंगाबाद विमानतळास गौतम बुद्ध विमानतळ असे नाव देण्यात यावे आणि संभाजीराजे यांची जन्मभूमी आणि परीनिर्वाण भूमी पुणे आहे म्हणून पुणे विमानतळास संभाजीराजे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्मिथच्या कृत्यानंतर आता रोहितचे कृत्य आले चर्चत
- शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलचा दारूण पराभव
- पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ
- जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे : रामदास आठवले
- ‘या’ तारखेस चित्रपटगृहात रिलीज होणार शाहिदचा ‘जर्शी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
