मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ( NCP ) नेते , गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad )यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेच्या वॉर्ड रचनेवरून जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या नेत्यांसह महापालिका आयुक्तांवर नाराजी व्यक्त करत हा आरोप केला आहे . आघाडी करण्याची आपली इच्छा आहे, मात्र तुमची इच्छा नसेल तर काय करणार असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे माझाच राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे मी बचावात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच आपल्या मतदारसंघातील जागा २३ वरून १८ वर आणत कळव्याचा एक वॉर्ड बनवताना तो मुंब्रापर्यंत नेण्यात गेला. पालकमंत्र्यांकडून असा प्लॅन केला जात नाही. त्यामुळे आयुक्तांनी त्यांच्या मनानेच केले असावे. तसेच एकूण २४ जागांपैकी सात हिंदू जागा आहे. यातून मुस्लिम द्वेषाचा प्रकार असल्याचे दिसते, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “बालिश आरोप करण्यापेक्षा राऊतांनी न्यायालयात जावे”,अतुल भातखळकरांचा टोला
- एकमेव टी २० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलँडकडून पराभव
- “…ऑफर नाकारली म्हणून”, संजय राऊतांचे थेट उपराष्ट्रपतींना पत्र; ईडीवर केले खळबळजनक आरोप
- “राहुल गांधी देशाबद्दल बोलतात आणि नरेंद्र मोदी…”; काँग्रेसची टीका
- “त्यांनी मला व्हॅनमधून…”; विराट कोहलीला आठवला जुना किस्सा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

