अहमदनगर : परतीच्या पावसाने अहमदनगरला झोडून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे साठवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आज नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले आहेत. यावेळी मुश्रीफांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
पाहणी, पंचनामे, मदत पुरेशी मिळेल का? जिल्ह्यात इतर तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री केवळ दोनच ठिकाणी पाहणी करणार असल्याने इतर तालुक्यांनाही नुकसान भरपाई मिळेल का? अशी शंका शेतकऱ्यांमधून उपस्थित केली जात होती.
या शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांची गाडी रस्त्यात अडवून सडलेला कांदा आणि इतर पिके त्यांच्यासमोर धरली. आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकरी करत होते. यावर हसन मुश्रीफ यांनी आठ दिवसांत तुम्हाला नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
- पवारसाहेब उगाच कोणालाही पक्षात घेणार नाहीत, त्यांची काही राजकीय गणितं असू शकतात : संजय राऊत
- ‘खडसे लवकरच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात खूप महत्त्वाच्या मंत्रिपदावर विराजमान होतील’
- ‘सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका’
- ‘खडसे लवकरच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात खूप महत्त्वाच्या मंत्रिपदावर विराजमान होतील’
- सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

