मुंबई : गेल्या वर्षाच्या अखेरीस देशातील जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातले असून देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला असून आता मुंबई उच्च न्यायालयाने देशासह राज्यातील इतर महापालिकांनी मुंबई महापालिकेचा आदर्श घ्यावा, असं नमूद केलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयात आज कोरोना संबंधित याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. राज्यात सध्या लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती बरी आहे. मात्र गंभीर स्थिती असलेल्या पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊन करावा, असं उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटलं आहे.
यासोबतच, सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील कोरोना स्थितीची दखल घेत मुंबई महापालिकेच्या कौतुकाचा देखील उल्लेख करत मुंबई महापालिकेची पाठ थोपटली आहे. ‘मुंबईतील ऑक्सिजन पुरवठ्याचा दाखला सर्वोच्च न्यायालयानही दिला ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र मुंबईचा आदर्श जर देशासाठी असेल राज्यातील इतर महापालिकांनाही तो घ्यायलाच हवा. राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा जीव जाणार नाही याची काळजी,’ असा सल्ला देखील उच्च न्यायालयाने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांनी चिथावणी देणाऱ्या सहकाऱ्यांना समजवावं; चव्हाणांचा इशारा
- ‘आदू…तुझ्या पप्पांनी केंद्र सरकारकडुन तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त’
- लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम
- सोलापूरकरांचा नाद खुळा! तीन लाखांचा दंड भरू पण, मास्क लावणार नाही
- कर्नाटकने अडवलेला ऑक्सिजन पुरवठा केंद्राने मध्यस्थी करून सुरळीत करावा – सतेज पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

