Share

मुंबई विमानतळ अखेर अदानी समूहाच्या ताब्यात, गौतम अदानी म्हणाले…

Published On: 

मुंबई – अदानी समूहाने जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा घेतला आहे. याबाबतचे निवेदन कंपनीने प्रसिद्ध केले आहे. जीव्हीके आणि अदानीमधील कराराला विमानतळ प्राधिकरणाने हिरवा कंदील दिला होता. इतर काही खात्यांकडून अद्याप यासाठी मंजुरी मिळणे बाकी होते. आता त्याला मंजुरी मिळाल्याने व्यवस्थापनाचा ताबा घेण्यात आला आहे.

मागील वर्षी ऑगस्टमध्ये अदानी समूहाने जीव्हीके ग्रुपसोबत करार केला होता. त्यानुसार जीव्हीकेच्या नावे असणारा 50.5 टक्के वाटा अदानी समूहाच्या नावे करण्यात येण्याचे निश्चित झाले होते. त्याचप्रमाणे कंपनीने मुंबई विमानतळामध्ये वाटा असणाऱ्या दोन दक्षिण आफ्रिकन कंपन्यांशीही करार करून त्यांच्याकडील 23.5 टक्के वाटा आपल्या नावावर करण्याचाही करार केला होता. मुंबई विमानतळावर हजारो नोकऱ्या उपलब्ध करू असे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी म्हटले आहे.

जयपूर विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम विमानतळ आणि गुवाहाटीमधील गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत. लखनौमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ, मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हक्कही अदानी समूहाला विकण्यासंदर्भात करार झाला आहे.

जुलै महिन्यातच यासंदर्भातील सर्व ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे बोलले जात आहे. ही सर्व विमानतळे पुढील 50 वर्षे अदानी समूहाच्या ताब्यात असतील. या काळात या विमानतळांचा विकास, प्रशासकीय कामकाज आणि देखभाल अदानी समूहाकडून करण्यात येईल. अदानी समूहाकडून देशातील अधिकाअधिक विमानतळांचा कारभार हाती घेण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!