Share

महावितरणाचा निष्काळजीपणा भोवला; शेतकऱ्याचा दीड एकर ऊस जळून खाक

Published On: 

नांदेड :महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकऱ्याला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या तारांचे घर्षण झाल्याने काढणीला आलेला ऊस जळून खाक झाला. वारंवार विनंती करून सुद्धा महावितरणने या विद्युत तारांचा बंदोबस्त न केल्याने, शेवटी ही दुर्घटना घडली. या घटनेत शेतकऱ्याचा दीड एकर ऊस जळून खाक झाला आहे.

रामदास तांडा येथील मुक्ताबाई रामदास पवार यांच्या दीड एकर शेतातील ऊस जळून खाक झाला. यात जवळपास पावणेपाच लाखाचे नुकसान झाले. सोनखेड पोलिस ठाण्यात जळीत प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. मुक्ताबाई पवार यांच्या शेतावर एक जवळपास दीड एकर ऊसाची लागवड करण्यात आली होती. महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या तारांचे घर्षण झाल्याने काढणीला आलेला ऊस जळून खाक झाला. जवळपास दीडशे टन ऊस त्याची किंमत चार लाख पन्नास हजार रुपये इतके नुकसान झाले आहे.

महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या तारा उंचावरुन घेण्यात यावे अशी विनंती यापूर्वी श्री पवार यांनी महावितरणकडे केली होती. मात्र महावितरणने ही त्यांच्या विनंतीला गांभीर्याने न घेतल्याने हा प्रकार घडला. वेळीच उंचावरुन तार घेतली असती तर हा प्रकार घडला नसता, या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!