Share

अतिवृष्टी, पीककर्ज, पिकविमा संदर्भात खासदारांनी घेतला जनता दरबार, अडचणीही सोडवल्या!

Published On: 

परभणी : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. त्यात अनेक भागातील पंचनामे अद्याप झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत परभणीचे खासदार संजय जाधव यांनी घनसावंगी तहसील कार्यालयात जनता दरबार घेत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.

सदरील बैठकीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सर्व बँकेचे मॅनेजर उपस्थित होते. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, पीककर्जात येणाऱ्या अडचणी, पिकविम्यासंदर्भातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न या बैठकीमध्ये करण्यात आला. तसेच अशा अडचणी सोडवण्याच्या सूचना खासदार संजय जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

परभणी आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये या वर्षी अतिवृष्टी झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यात पंचनामे न झाल्याने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राजकीय मंडळी आणि प्रशासन जागे झाले आहेत. शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!