औरंगाबाद : शहराचे खासदार इम्तियाज जलील यांनी जालना रोड वरील वक्फ बोर्डच्या जागेवर तब्बल १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या घोटाळ्यात शहरातील बड्या धनाढ्यांच्या नावाचा उल्लेख, तसेच तत्कालीन अधिकारी वर्ग यांच्या वर कारवाईची मागणी करत, लवकरात लवकर जागे संबंधी निकाल लागला नाही तर २६ फेब्रुवारी रोजी कार्यकर्ते तसेच नागरिकांना घेऊन ते आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले.
जालना रोड वरील वक्फ बोर्डच्या जागेत अनेक दुकाने बांधण्यात आली आहे. त्या जागा वक्फ बोर्डाने भाडेतत्वावर दिल्या होत्या. त्या जागेचे झालेले करार हे बेकायदेशीर असून त्या कारारात शहरातील बड्या धनाढ्य आसामींनी जागा दिल्या आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी थेट मा. नगरसेवक राजू तनवाणी, विकासक जुगलकिशोर तापडिया, कैलास बाफना यांचा उल्लेख केला आहे.
यासंबंधी खा. इम्तियाज जलील यांनी सरकार दरबारी पत्र व्यवहार केला आहे. तसेच गृहमंत्री यांना देखील याविषयी माहिती देण्यात आली असून, याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त यांना दिले आहे. चौकशी पूर्ण होऊन वक्फ बोर्डाकडे जागा हस्तांतरित झाली नाही तर ख. इम्तियाज जलील आमरण उपोषण करणार आहे. आगमी मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर हा घोटाळा उघड झाला करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी राहुल द्रविडचा खास गुरु मंत्र, अजिंक्य रहाणेने सांगितलं गुपित
- आता मिळावा 69 हजारांच्या डाऊनपेमेंटमध्ये ‘ही’ कार खरेदी करण्याची संधी !
- आ. किशोर जोरगेवार यांनी घेतली मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची भेट
- ‘तुमच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सगळी कागदपत्रं माझ्या खिशात लवकरच सगळे डिटेल्स देतो’
- टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! इंग्लंडच्या ‘या’ धाकड फलंदाजाचे पुनरागमन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

