Share

विनामास्क फिरणाऱ्यांना मोक्षदा पाटील म्हणाल्या..

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्ह्यात ११ ते ४ मार्च पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात झपाट्याने रुग्ण वाढत असतांनाही अनेक नागरिक अजूनही नियमांना पायदळी तुडवत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गंगापुर शहरास भेट देऊन पायी फिरत कोरोनाविषयक जनजागृती केली. तसेच विनामास्क नागरिकांना मास्क घालण्याबाबत समजावून सांगत दंड केला.

औरंगाबाद जिल्ह्यासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. या अनुषंगाने ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गंगापुर शहरास अचानकच भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांना बहुतांश नागरिक विनामास्क दिसून आले. येथील बाजारपेठ, लासुर नाका, शिवाजी चौक याठिकाणी विनामास्क फिरणा-या नागरिकांना त्यांनी मास्क का घालावे याबाबत समजावून सांगितले. त्याचप्रमाणे अनेकांवर कारवाई देखील केली.

तसेच बाजार पेठेतील दुकानामध्ये कोविड-१९ बाबतच्या खबरदारीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. गंगापुर शहरात सार्वजनिक स्तरावर विनामास्क फिरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणा-या १६१ नागरिकांविरूध्द दंडात्मक कारवाई करत १६,१०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणा-या विरूध्द १८८ भादंवी प्रमाणे २२ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ११ हॉटेल चालक व २ व्यायाम चालकासह, १ मंगलकार्यालय चालकाचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!