औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील हतनूर टोल प्रकरण सध्या गाजत आहे. सोलापूर धुळे महामार्गावर हतनूर येथे टोल नाका सुरु करण्यात आला आहे. त्या नाक्यावर्तून स्थानिकांना पास देण्याचे ठरले असताना, त्यांच्या कडून टोल वसुली केली जात असल्यामुळे हर्षवर्धन जाधवांनी टोल चालकांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
टोल नाक्यापासून 20 किलोमीटर परिघातील नागरिकांना 275 रुपयात मासिक पास मिळणार आहे.पास देण्यासाठी टोल प्लाझावर चार काउंटर लावलेले आहेत.अटीत बसत असलेल्या स्थानिकांनी आपल्या गाडीचे आर.सी.व आधार कार्ड दिल्यावर त्यांना मासिक पास दिला जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात ते झाले नाही. तसेच टोल नाक्यावर कोणते फलक देखील लावले नसल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी कॉल वर बोलत केंद्रीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांचा जमाव होता, ते कार्यकर्त्यांना सतत आक्रमक न होण्याच्या सुचना देत होते. तब्बल तास भर हर्षवर्धन जाधव यांनी टोल चालकांना फैलावर घेत, लवकरात लवकर पास वितरीत करण्याची मागणी धरली. तसेच काही काल दमदाटी टोल नाका बंद पडून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्यांनी सोडून दिले.
महत्वाच्या बातम्या
- जबरदस्तीने वीजबिल वासून कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

