🕒 1 min read
नवी दिल्ली: न्यायपालिकांमध्ये न्यायाधीशांची पडे न भरण्यावरून नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदंबरम यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदी सरकारला भाजप विचारसरनीचे न्यायाधीश पाहिजे, म्हणूनच गेली ७ वर्षांपासून पदे रिक्त आहेत.असा टोला लगावत त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले.
उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या १०८० पदांपैकी ४१६ पदे रिक्त आहेत. अशे विधान पी. चिदंबरम यांनी केले आहे. त्यामुळे भाजपला भाजपप्रणीत आणि संघाच्या विचाराची माणसे हवी आहेत. म्हणूनच पद भरती केली जात नसल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.
7 साल से सत्ता पर काबिज श्री मोदी की सरकार इन रिक्तियों को भरने में सक्षम या इच्छुक क्यों नहीं है?
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) August 7, 2021
आपल्या देशात पात्रता असलेले वकील आणि न्यायाधीश यांची कमतरता नाही, असे असूनही पदभरती का केली जात नाही; मोदी सरकारला पद भरण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान न्यायविभागामध्येही भाजप राजकरण करत असल्याचा आरोप यातून कॉंग्रेसने भाजपवर केला आहे. त्यामुळे आता तरी न्यायपालिकेतील पद भरती होईल का, हा प्रश्न केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आज होणार अजित पवार यांची बैठक, पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
- आयपीएल स्पर्धेत बीसीसीआयने बायोबबलचे नियम केले कठोर, उल्लंघन झाल्यास कुटुंबावरही होणार कारवाई
- पहिली कसोटी निर्णायक टप्प्यात, विजयासाठी भारताला हव्या १५७ धावा
- पुणे शहरात आज नव्याने २०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपच्या गिरीराज सिंह यांची इटालियन भाषेत पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
