मुंबई: काल (१० मार्च) पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले. पंजाब व्यतिरिक्त चार राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यात गोव्यातही भाजपने आघाडी घेतली. याचे सर्व श्रेय गोव्याचे प्रभारी तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाते. आज त्यांचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी सर्व-सामान्य माणसांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे एकच नेते असल्याचे म्हटले आहे.
“उत्तर प्रदेशच्या तसेच इतर चार राज्यांच्या निकालानंतर हे सिद्ध झाले आहे की, सामन्यांच्या मनात मोदीच आहेत. ज्या प्रकारे चार राज्यांत मोदींच्या नेतृत्वात विजय मिळाला आहे. त्यात देशात ३७ वर्षांनंतर युपीत पहिल्यांदा भाजप पक्ष सतत दुसऱ्यांदा निवडून आले आहे. गोव्यातदेखील मला हाच अनुभव आला. गोव्यात Anti-incumbency असे म्हटले जात होते. मात्र मोदींच्या जादूमुळे त्याची pro-incumbency झाली.”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी फडणवीस यांनी विजयाने नम्र व्हायचं, विजयाने मेहनत करायची आहे. ‘अभी तो असली लडाई मुंबई में होगी’ आम्हाला मुंबईला कोणत्या पक्षापासून वेगळं करायचं नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. असेही म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
भाजपच्या यशानंतर मोदींचा गुजरात दौरा; रोड-शो मध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणा
दत्तक मुलगा आईची जात लावू शकतो; हायकोर्टाने दिला मोठा निर्णय!
… आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू बोलता बोलता पाण्यात पडला; मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
२०२४ मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

