मुंबई: गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळवून देणारे गोवा प्रभार तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत ढोल-ताशाच्या गजरात आणि घोषणांनी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा दावा केला आहे. २०२४ मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल, असे ते म्हणाले आहेत.
“मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाही तोपर्यंत आम्ही दम घेणार नाही. आज विजय साजरा करा, उद्यापासून कामाला लागा. आता महाराष्ट्रात सत्तांतर अटळ असून, २०२४ मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल.”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान विजयाने नम्र व्हायचं, विजयाने मेहनत करायची आहे. ‘अभी तो असली लडाई मुंबई में होगी’ आम्हाला मुंबईला कोणत्या पक्षापासून वेगळं करायचं नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. असेही फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत केला बदल; उत्पादन वाढण्याची दाट शक्यता!
‘महाराष्ट्राला सर्व सुविधा केंद्राने दिल्या, त्यामुळे…’; फडणवीसांचा राज्यसरकारला टोला
“लढाई अजून संपलेली नाही, खरी लढाई…”, देवेंद्र फडणवीसांचा इशारा
- “गेली ५० वर्ष आम्ही मुंबई पालिका लढतोय इथे भगवा कायम राहणार”, राऊतांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

