Share

मोदी सरकारचा जम्मू काश्मीरमध्ये ‘राजकीय भूगोल’ बदलण्याचा डाव

Published On: 

🕒 1 min read

टीम महारष्ट्र देश : गृह मंत्रालयाची पदभार स्वीकारताच अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरु केली आहे. तर जम्मू-काश्मीरबाबत बैठका सुरु झाल्या आहेत.या बैठकांमध्ये जम्मू-काश्मीरच्या विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगाचं लवकरच गठन करण्यात येणार आहे. राज्‍यातील काही जागा SC/ST प्रवर्गासाठी आरक्षित ठेवल्या जावू शकतात.

तीन दिवसापूर्वी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. राज्यपाल मलिक यांनी अमित शहा यांची भेट घेत जम्मू-काश्मीरवर एक ३ पानांचा अहवाल सादर केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या अहवालात जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच पुनर्रचना आयोगाची नियुक्ती केली जावू शकते.

पुनर्रचना आयोगाच्या अहवालानंतर जम्मू-काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघाच्या सीमा बदलण्यात येणार आहेत. तर काही जागा या आरक्षित केल्या जाणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या असलेले मतदारसंघ योग्य प्रकारे नसल्याचं केंद्र सरकारचं मत आहे. जम्मूसोबत न्याय होत नसल्याचा त्यांचं मत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!