🕒 1 min read
मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं घुमू लागलं असून, राज्यातील सगळे पक्ष निवडणुकीची तयारी करायाला लागले असल्याचं दिसून येतं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठी-भेटींमुळे मनसे आणि भाजप यंदाची मुंबई पालिकेची निवडणुक एकत्र लढवणार असल्याचं बोललं जात होतं.परंतू याहीवेळी मनसे स्वबळावर निवडणूक असल्याचं समजतं आहे. अशातच मनसेने देवेंद्र फडणवीस यांच्या निशाणा साधला आहे.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे काय म्हणाले ?
विदर्भामध्ये भाजप सत्तेत असूनही त्या ठिकाणची अवस्था पाहून लोकांनी विचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना आता नवीन लोकांना संधी द्यायची असून, जनता जुन्या लोकांना कंटाळली आहे, असं म्हणत मनसे पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
तसेच, मनसे नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला या महापालिकेच्या निवडणुका देखील पूर्ण ताकदीने आणि मोठी तयारी करुन लढवणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मनसे पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नसून, मनसेने मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. राज ठाकरे यांचे आदेश आम्हाला मिळाले असून पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याचा निर्धार आम्ही केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सर्व 227 जागांवर उमेदवार देणार असल्याचंही संदीप देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Flipkart Sale | iPhone चाहत्यांसाठी खुशखबर..iPhone 13 आणि iPhone 12 mini वर बंपर ऑफर, सर्वात कमी किमतीत उपलब्ध असतील
- Raj Thackeray | भाजपच्या जवळ जाणाऱ्या राज ठाकरेंना भाऊ उद्धव यांनी सामनातून केलं सावध, म्हणाले…
- Devendra Fadnavis । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यक्ती नव्हे तर विद्यापीठ – देवेंद्र फडणवीस
- Uday Samant | “स्वत:च्या कर्माचं खापर दुसऱ्यांवर फोडायची प्रवृत्ती सध्या सुरू आहे”
- Electric Scooter Hacks | इलेक्ट्रिक स्कूटर घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
