Share

“मग महाराष्ट्रात हे वावटळ…”, योगी सरकारने केलेल्या ‘त्या’ कारवाईवर अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात भोंग्याच्या मुद्यावरुन राजकारण तापले असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निर्देशांनुसार उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत जवळपास ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. दरम्यान, योगी सरकारच्या या कारवाईवर आता मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात अविनाश जाधव यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,‘उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळांवरील एकूण ६०३१ भोंगे उतरवताना एकाही ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली नाही. मग महाराष्ट्रात कुठून कायदा सुव्यवस्था बिघडण्याच वावटळ उठवल जातय?’ तसेच सरकारची इच्छाशक्ती नाही? की सरकारला मुद्दामून हे घडवायच आहे?, असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी भोंग्यांसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यावेळी प्रत्येक धर्माला त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी माईक, स्पीकर यांचा वापरही करण्यास हरकत नाही. मात्र कुणाचाही अडथळा करुन जी गोष्टी केली जाते, त्याला प्रार्थना म्हणता येऊ शकत नाही, असे योगी म्हणाले होते. तसेच नव्याने माईक लावण्यासाठी परवानगी देऊ नये, असे आदेशही उत्तर प्रदेश सरकारकडून जारी करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!