Share

शेतकऱ्यांसाठी मनसेचा पुढाकार, हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

Published On: 

औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधी दुष्काळामुळे होरपळलेला शेतकरी आता अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. या सर्वाचा गांभीर्याने विचार करुन औरंगाबादमधील शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन दिले.

या निवेदेनामध्ये मनसेनेच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी ५०,००० रुपयांची त्वरित मदत करा, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये म्हटले की, ‘जिल्ह्यातील आतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेच तसेच जनावरांचाही यामध्ये जीव गेले आहेत. तसेच घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. म्हणून या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून हेक्टरी ५०,००० रुपयांची त्वरित मदत करावी.’

गेल्या वेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झालेले नसतांना शेकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने मदत करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. या वेळी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष दिलीप चीतलांगे, दिलीप बनकर पाटिल आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!