Share

परतीच्या पावसाने भाजपला झोडपले.

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्रातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरील ‘परतीचा पाऊस’ भाजपसाठी तापदायक ठरत असल्याचा टोला या व्यंगचित्राच्या माध्यमातून लगावण्यात आला आहे. राज ठाकरेंचे हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आपल्या फेसबुक पेज लाँचवेळी राज ठाकरे यांनी सोशल मीडियाचा वापर करुन सत्तेत आलेल्या भाजपाला दुटप्पी भूमिकेवरुन खडे बोल सुनावले होते. भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.

पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात आणि जनतेला राजा, मग राजाने सेवकाला कामचुकारीबद्दल प्रश्न विचाराचे नाहीत? आणि सोशल मीडियावर जाब विचारला म्हणून तुम्ही नागरिकांना पोलिसांकरवी नोटीसा धाडणार? पंतप्रधानांच्या फसलेल्या योजनांविषयी लिहिलं, त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि पोलिसांना जर धडाधड नोटिसा पाठवायला लावणार असाल तर मग तुम्ही पोसलेल्या लाखो ‘ट्रोल्सचं’ काय? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी विचारला होता.

https://www.facebook.com/RajThackeray/photos/a.165383467326144.1073741826.165370377327453/243861742811649/?type=3&theater

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!