🕒 1 min read
मुंबई: कोरोनामुळे राज्यशासनाने यंदा दहीहंडीवर बंदी घातली आहे. मात्र मनसेने यंदाची दहीहंडी फुटणारच असा निर्धार केला होता. त्यानुसार मनसेने ठाण्यात मध्यरात्री दहीहंडी फोडली. मात्र यावेळी मनसेने शासनाचे नियम झुगारून लावले आहेत.
ठाण्यात दहिहंडी फोडू दिली नाही तर, दादरमध्ये करू, असा इशारा मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिला होता. दरम्यान दहीहंडी साजरी करण्यावरूनच ठाण्याचे मनसे प्रमुख अविनाश जाधव यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देशपांडे यांनी ही भूमिका घेतली होती. त्यानुसार ठाण्यात अखेर मनसेने दहीहंडी फोडलीच. तसेच घाटकोपर येथे राजू सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोपाळकाला साजरा करण्यात आला.
दरम्यान नाशिकमध्येही मनसेने दहीहंडी फोडली आहे. यामुळे मनसेने शासनाचे सर्व नियम झुगारून लावत उत्सव साजरा केला आहे. आता यावर पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सतर्क राहा : पुढचे ३-४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान विभागाचा अंदाज
- नितेश राणेंनी केले ‘ते’ वादग्रस्त ट्वीट डिलीट; उलटसुलट चर्चांना आले उधाण
- ‘बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकीन ‘मधुशाला’; भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल
- धार्मिक स्थळं बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय?, राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल
- ‘लोकांचा जीव वाचवणे पाप असेल तर मविआ सरकार हे पाप करत आहे, ‘ काँग्रेसच्या सीमा थोरातांचा भाजपवर पलटवार!


