मुंबई : वीज बिल मुद्यावरून आज आंदोलन छेडणार असून, आज मुंबईमध्ये राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात अली आहे. या बैठकीसाठी राज्यभारतले नेते, सरचिटणीस, जिल्हा अध्यक्ष, विभाग प्रमुख, यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले असून राजगडावर ही बैठक होणार आहे. या बैठकीत पुढ्यच्या आंदोलनाची काय दिशा असणार आहे हे ठावरलं जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जो आदेश देतील तसे पुढचे आंदोलन असणार आहे असे मनसेचे नेते संदीप देशपाडे यांनी स्पष्ट केलं आहे.
टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरून आतापर्यंत निवेदन, अर्ज बैठका, विनवण्या हे सगळे उपाय करुन झाले. तरीही सरकार ढिम्म आहे. त्यामुळे आता जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री गुलाबराव पाटील ‘या’ नवसाची पूर्ती करण्यासाठी आले शिर्डीच्या साई दरबारी!
- शंभर पिढ्या जरी उतरल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच; संजय राऊतांचा भाजपवर पलटवार
- कौतुक आणि टीकेचं मी स्वागत करते,तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन मी पुन्हा येईन : अमृता फडणवीस
- वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर जनतेला दिलासा देण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल : मनसे
- अनुदानाच्या श्रेयासाठी पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी-भाजप-शिवसेनेत रस्सीखेच!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

