Share

नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आ.कानडेंनी केला बैलगाडीतुन प्रवास

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- श्रीरामपूर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत.

तालुक्यात झालेल्या पावसामुळे छोट छोटी गाव, वाड्यावस्त्या जलमय झाल्या आहेत. या जोरदार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी चक्क शेतकऱ्यांच्या समवेत बैलगाडीतून प्रवास केला. व नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

तालुक्यातील अनेक भागात काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतात पाणी साचले असून पिके सडून जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कपाशी, भुईमुग, कांद्याची रोपे, बाजरी यांसारखी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अति पावसाने बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश आमदार लहू कनडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

परतीच्या पावसाने तालुक्यातील जाफराबाद येथील साठवण तलाव यंदा पुर्ण क्षमतेने भरला आहे. तलावातील पाणीसाठ्यामुळे नायगावसह जाफराबाद शिवारातील खरीपाचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान या भागाची पाहणी करण्यासाठी आ.कानडे श्रीरामपूर येथुन गोदावरी नदी परिसरात जाण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांना वैजापूर-श्रीरामपूर खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागला. रस्त्यावरील खड्डे चुकवत अखेर त्यांनी नायगाव शिवार गाठले. त्यानंतर अतिपावसामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आ.कानडे यांनी बैलगाडीतुन प्रवास केला.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!