अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घडल्याचे समोर आले आणि एकच खळबळ उडाली. फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
येत्या काही दिवसांत राज्यामध्ये सत्तांतर होणार असून भाजपचे सरकार येणार आहे व नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असून ते लवकरच आमच्या सोबत येणार आहेत असे खळबळजनक विधान माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले आहे. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर ते बोलत होते.
स्थायी समिती सभापती पदासाठी मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. व नंतर त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड देखील झाली.
त्यानंतर भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते देखील येत्या काळात आमच्यात येतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संग्राम जगताप यांनी केला होता. याबाबत माजी मंत्री कर्डिले यांना विचारले असता त्यांनी राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचेच नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
थोड्याच दिवसांत राज्यात भाजपचे सरकार येणार असल्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर ते त्यांच्या स्वार्थासाठी किंवा पदासाठी राष्ट्रवादीत गेले असावेत. त्याबाबतचा सविस्तर खुलासा शहाराध्यक्ष व महापौर यांनी केला आहे. संबंधित नगरसेवकावर काय कारवाई करायची, याबाबत शहराध्यक्ष निर्णय घेतील, असेही कर्डिले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
- शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये; ‘या’ काँग्रेस नेत्याचा राऊतांना टोला
- आम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही; संजय राऊतांच्या भेटीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
- राजकारणात कुणी मित्र किंवा दुश्मन नसतो : शिवसेना नेत्याचे सूचक वक्तव्य
- शेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन
- भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ९१ वा वाढदिवस!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

