🕒 1 min read
ठाणे : महाराष्ट्र म्हणलं की वडापाव, मिसळ, भाकरी आणि चरचरीत पदार्थांची मेजवानी समोर येते. सद्या तरुणाईमध्ये देखील परदेशातील पिझ्झा, बर्गरला मिसळचा ट्रेंड तोड देताना दिसत आहे. कोल्हापूर, नाशिक, पुणे, ठाणे अशी काही शहरे मिसळीसाठी प्रसिद्ध आहेत.
या मिसळीला खास ओळख मिळवून देणारे महाराष्ट्राचे ‘मिसळसम्राट’ अशी ख्याती निर्माण करणारे सुप्रसिद्ध ‘मामलेदार मिसळ’चे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं आज निधन झालं आहे. ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अल्पशा आजारामुळे गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे दुःख व्यक्त केलं आहे. ‘ठाण्यातील मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं निधन. मुर्डेश्वर यांना कोरोनाची लागण झाल्यानं १५ दिवसांपासून ठाण्याच्या कौशल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज दुपारी १२.३० च्या सुमारास मुर्डेश्वर यांचं निधन झालं.’ असं सांगत त्यांनी श्रद्धांजली देखील वाहिली आहे.
मामलेदार मिसळीला आज ७० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या मिसळीची ख्याती महाराष्ट्रासोबतच जगभरात देखील आहे. राजकारणी ते कलाकार अशा सर्वांनाच या मिसळीने भुरळ घातल्याचे दिसून येते. या मिसळीला ‘ब्रँड’ बनवण्यामध्ये लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं मोठं योगदान आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अनेकदा या मिसळीचा आस्वाद घेतला असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगेलच व्हायरल होत असतात. भाजप नेते नारायण राणे ५००-६०० प्लेट्सची ऑर्डर द्यायचे व विधिमंडळातील आमदार, सदस्यांसह अधिकाऱ्यांना देखील या मिसळीची मेजवानी द्यायचे. असे अनेक किस्से या मिसळीबाबत प्रसिद्ध आहेत.
महत्वाच्या बातम्या
-
‘योगींच्या पापात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सहभागी होऊन महाराष्ट्राशी द्रोह करू नये’
-
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसने कसली कंबर; निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना
-
एकाही केंद्रीय मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, त्याची कॉलर पकडून जाब विचारणार – शेट्टी
-
सर्वोत्कृष्ट गीतकार उदित नारायण यांचा ६५ वा जन्मदिवस
-
धनंजय मुंडे म्हणाले विजय आमचाचं; प्रीतम मुंडे म्हणतात गुलाल आमचाचं!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
