🕒 1 min read
उस्मानाबाद : लग्नाच्या योग्य वयाची वाट न बघता सामाजिक दबावाखाली मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. याची किंमत मुलींना चुकवावी लागते आणि कधी कधी तर ती जीव गमावून चुकवावी लागते. अशी दुर्दैवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराची पुसटशी कल्पनाही नसलेल्या अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी आणि सोळाव्या वर्षी मातृत्व येऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह इतर सहा लोकांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अल्पवयीन मुलीचा विवाह उस्मानाबाद तालुक्यातील उत्तमी कायापुर येथील अजित बोंदर या 28 वर्षीय तरुणाशी करण्यात आला होता. कोरोना काळात 11 जून 2020 रोजी या दोघांचा विवाह सोहळा उत्तमी कायापुर येथे पार पडला. त्यानंतर अवघ्या वर्षभराच्या आतच सदरील मुलगी गरोदर राहिली. 7 ऑक्टोंबर रोजी तिला बाळंतपणासाठी उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, 13 ऑक्टोंबर रोजी अशक्तपणामुळे तिला सोलापूर येथे हलवण्यात आले यादरम्यान तिचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. 14 ऑक्टोंबर रोजी तिचे सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. मात्र, 15 ऑक्टोंबर रोजी या अल्पवयीन मातेच्या निधन झालं. कमी वयात लग्न केल्याने आणि मातृत्व आल्याने एका मुलीचा मृत्यू झाला.
त्यामुळे या प्रकरणी मुलीचे (वडील) भारत घुगे,(आई) चंद्रकलाबाई घुगे (मुलीचे काका) लक्ष्मण घुगे,राम घुगे तर (पती) अजित बोंदर,(सासू) जनाबाई बोंदर,(सासरा) धनराज बोंदर आणि (मुलीची मावशी) सुरेखा बोंदर यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 गुन्हा रजिस्टर नंबर 00/2021 9.10.11. कलमान्वये ग्रामसेवक देविदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे’
- phone-pe वरून मोबाईल रिचार्ज करण्यासाठी द्यावे लागणार अधिक शुल्क
- ‘माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम…’, मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर
- आर्यनला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी? भाजप नेते राम कदम म्हणतात…
- जम्मूच्या नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचे युग आता संपले आहे – अमित शाह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
