मुंबई : राज्यावर कोरोनाचे संकट आले आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. असे असताना डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी आपले कर्तव्य उत्तम रित्या बजावत आहेत. असे असतानाच काही डॉक्टरांनी आपले खाजगी दवाखाने बंद ठेऊन रुग्णसेवा करण्यास नकार दिला आहे.
मानवावर अशी बिकट परिस्थिती असताना डॉक्टरांनी असे पाठ फिरवणे बरोबर नाही. राज्य शासनाने खाजगी डॉक्टर्सना आपल्या दवाखान्यातून रुग्ण सेवा करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील काही डॉक्टर्स आपले कर्तव्य बाजवताना काचरताना दिसतायत. अशा डॉक्टर्सवर आता राज्य शासनाने कठोर पाऊलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी टाळाटाळ करणाऱ्या डॉक्टरांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा दिला आहे.
दरम्यान आरोग्य क्षेत्रातील सर्व डॉक्टर्स आणि विश्वस्थांची बैठक घेऊन सर्व प्रकारच्या रुग्णांना सेवा देण्याबाबतचे आदेश राज्य शासनाने दिले होते. तरीदेखील काही ठिकाणी डॉक्टर्स हलगर्जीपणा करत असल्याचं समोर येत आहे. तसेच याबाबतच्या तक्रारी देखील नोंदवण्यात आल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

