🕒 1 min read
लातूर : उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्प धरण शंभर टक्के भरले असून तिरु प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीच्या कामास निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले. जलपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी बंद नलीकेव्दारे व एक हौद वितरण व्यवस्थेनुसार साठ्यामधील शेतकऱ्यांसाठी कसे सिंचन करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तिरु धरणाचे ‘गोडबोले द्वार’ याची पाहणी केली. तसेच हे व्दार अपोआप उघडत नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर संबंधित यंत्रणा कंत्राटदार यांची तातडीने बैठक लावण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. तसेच हे व्दार तात्काळ दुरुस्ती करण्याच्याही सूचना दिल्या.
तिरुच्या कालव्याचा सर्वे तात्काळ पूर्ण करुन अंदाजपत्रक शासनास सादर करावे तसेच तिरु नदीवरील संरक्षक भिंतीचे तात्काळ बांधकाम सुरु करण्याच्या सूचना दिल्या. उदगीर, जळकोट तालुक्यातील विकास कामे मंजूर झालेली व प्रस्तावित कामांसंदर्भात सर्वांना माहिती करुन दिली. हा प्रकल्प शंभर टक्के भरला असून येत्या रब्बी, उन्हाळी हंगांमासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबतचे आवाहन मोमीन नसीम यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’
- वेळ गेलेली नाही, अजूनही शिवसेना-भाजपची युती होऊ शकते; आठवलेंना विश्वास
- ‘पवारांवर जनताच नाराज; त्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार नाही’
- ‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही’
- ‘..आता कोथळा काढायची भाषा केली जाते!’, शरद पवारांचे महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
