Share

‘भिवंडीत ‘म्हाडा’ बांधणार २० हजार घरे’, जितेंद्र आव्हाडांची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

भिवंडी : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. भिवंडी पालिका प्रशासनाने भूखंड उपलब्ध करुन दिल्यास भिवंडीतही म्हाडा २० हजार घरांची उभारणी करेल, असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी भिवंडी महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. तसेच महापौर प्रतिभा पाटील, आयुक्त सुधाकर देशमुख यांसह अधिकारी, पदाधिकारी यांच्यासोबत त्यांनी याबाबत आढावा बैठक घेतली आहे. भिवंडी क्षेत्रात अनेक अनधिकृत घरे नागरिकांनी बांधली आहेत. तर दरवर्षी याठिकाणी पावसामुळे अनेक दुर्घटना घडत घडतात. यातच याठिकाणी शुक्रवारी सकाळी आजमी नगर भागात एक अनधिकृत इमारत कोसळून दुर्घटना झाली आहे. त्यात एका व्यक्तीचा बळी गेला आहे.

दरम्यान या घटनेमुळे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दुर्घटनेत बळी गेलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपये मदत आणि त्यांच्यावरील उपचाराचा खर्च महापालिका प्रशासन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!