Share

औरंगाबादेत पुन्हा नळाला मीटर… व्यावसायिक ग्राहकांपासून होणार सुरूवात

Published On: 

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरातील सुमारे २५ हजार व्यावसायिक मालमत्तांच्या नळांना मीटर बसविण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सीईओ आस्तिक कुमार पांडेय यांनी घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या दोन महिन्यात केली जाईल. असे यांनी बुधवारी स्पष्ट केले.

शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील निवासी नळांना मीटर लागण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वीच व्यावसायिक नळांना मीटर लावण्याचा निर्णय पांडेय यांनी घेतला होता. या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, ज्या शहरात दररोज १२५ एमएलडी पाणी मिळत आहे. त्यामुळे पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. आणि पुरवठा यामध्ये सुधारणा केली जाईल. दरम्यान २५ हजार नळ कनेक्शन असल्याची महापालिकेकडे नोंद आहे.

या नळांना मीटर बसविण्याची प्रक्रिया येत्या दोन महिन्यात राबविण्यात येईल असे पांडेय यांनी नमूद केले. शहरात अनेकांनी निवासी मालमत्ता म्हणून नळ घेतले आहेत. पण वापर मात्र व्यवसायिक सुरू आहे. त्यांना पाणीपट्टी आकारण्‍यात अडचणी येत आहेत. व्यवसायिक मालमत्तांना देण्यात आलेले नळांना कनेक्शन लवकरच शोधण्यात आले असून त्याकरिता वॉटर मीटर बसविण्याची प्रक्रिया दोन महिन्यात सुरू केली जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतील वॉटर मीटरची खरेदी करण्यात येणार आहेत तसे पांडेय यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!