Share

मराठवाडा सुन्न; जालना जिल्ह्यात आईची चार मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील एका विवाहितेने कौटुंबिक वादातून पोटच्या चार लेकरासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून संपुर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गंगासागर ज्ञानेश्वर अडाणी (३२), भक्ती (१३), ईश्वरी(११), अक्षरा(९) व मुलगा युवराज (७) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव गावातील ज्ञानेश्वर प्रल्हाद अडाणी हे पत्नी गंगासागर अडाणी व तीन मुली आणि एक मुलासह गावात राहतात. गुरुवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान गंगासागर या तीन मुली व मुलासह शेतात चक्कर मारायला गेल्याचे अनेकांनी पाहिले. गंगासागर यांनी मुलामुलीसह सायंकाळी साडेपाच शेतातच वेळ घालवला. सात वाजेपर्यंतही गंगासागर व मुलेमुली घरी न परतल्याने ज्ञानेश्वर अडाणी व गावातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधाशोध केली. परिसरातील सर्व विहिरी व जायकवाडी डावा कालवा परिसर पिंजून काढला मात्र त्या आढळून आल्या नाही.

सकाळीच काही जणांना अडाणी यांच्या शेताशेजारच्या गणेश फिसके यांच्या गट नं ९३ मधील विहिरीत या पाचही जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आले. गंगासागर अडाणी हिने आपल्या चार मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे आढळून आले. दरम्यान या घटनेची माहिती गोदी पोलीस ठाण्यात दिल्याने घटनास्थळी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ सह कर्मचारी हजर होऊन या पाचही जणांचे मृतदेह विहिरी बाहेर काढून शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गोदी पोलिसांनी ज्ञानेश्वर अडाणी यांना ताब्यात घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!