Share

राज्य सरकारची उदासिनता आणि अनास्था यामुळेच मराठा आरक्षण रद्द झाले – महाडिक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं आहे. यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आरक्षण रद्द होण्याचं खापर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडलं आहे. माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांनी देखील राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेला निकाल अनपेक्षित आणि दुर्दैवी म्हणावा लागेल. राज्य सरकारने ही बाब गंभीरपणे घेतली नाही, सरकारमधील तीनही पक्षांमध्ये समन्वय नाही. राज्य सरकारची उदासिनता आणि अनास्था यामुळेच मराठा आरक्षण रद्द झाले आहे. तमाम मराठा समाजाची दिशाभूल करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध..’ अशा शब्दांत धनंजय महाडिक यांनी संताप व्यक्त केला आहे.

याची जबर किंमत मोजावी लागेल – समरजितसिंह घाटगे

महाविकास आघाडी सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्याचाच हा परिणाम आहे. यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. याची जबर किंमत महाविकास आघाडी सरकारला मोजावी लागेल, असा इशारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज, शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजप कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!