औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील अनेकांनी बलिदान दिले आहे. त्या नंतरच राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घेतली होती. या आंदोलनात शहिद झालेल्या तरुणांच्या नातेवाईकांना नोकरी देण्याचे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, हे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नसल्याने पहिवहन मंत्री अनिल परब यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देत आश्वासनाची आठवण करुन देण्यात आली.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर आले आहे. त्यांनी जिल्ह्यातील परिवहन व्यवस्थेचा आढावा घेतला. या वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने परब यांना एक निवेदन दिले. त्यामध्ये मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या मुलांच्या नातेवाईकांना शासकीय नोकरी देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. यात राज्य शासनाने आश्वासन दिले होते, त्याच मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्य शासनाने तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी या शहीद झालेल्या मुलांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही नियुक्ती न झाल्याने हे निवेदन देण्यात आले. यापूर्वी याच मागण्या विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे यांच्याकडेही करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. या संदर्भात तत्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंना झटका ; मनसेचे शॅडो कॅबिनेट मंत्री आदित्य शिरोडकरांनी केला शिवसेनेत प्रवेश
- ‘गो कोरोना गो’ नाऱ्यानंतरही कोरोना झाल्याचं म्हणत आता रामदास आठवलेंनी दिला नवा नारा
- हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का; अजितदादांच्या उपस्थितीत चुलत भावाचा राष्ट्रवादीत प्रवेश
- ‘पवार हे धोकेबाज नाहीत तर ते देशाचे नेते आहेत, राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्यांना बळीचा बकरा करू नये’
- महाराष्ट्राच्या कोरोना स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

