🕒 1 min read
सोलापूर – राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 17 एप्रिलला मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी 23 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून 30 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 3 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
दरम्यान विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून कै.आमदार भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचे नाव आघाडीवर आहे तर दुसरीकडे समाधान आवताडे, शैला गोडसे,अभिजित पाटील हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे भगीरथ भालके यांना जर तिकीट दिले नाही तर मातोश्री जयश्री भालके तिकीट दिले जाईल अशी देखील नावाची चर्चा आहे. नेतेमंडळी आणि कार्यकर्ते यांच्याकडून मतदारांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे असून त्यामध्ये घरगुती कार्यक्रमांबरोबर सांत्वन व इतर कार्यक्रमांना हजेरी लावून मतदारांशी जवळीक साधून पोटनिवडणुकीच्या संदर्भात चाचपणी केली जात होती.
दरम्यान,काही महिन्यांपूर्वी भारत भालके यांचं निधन झालं होतं. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. यानंतर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.
भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. 2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.
महत्वाच्या बातम्या
- घरपट्टी व नळपट्टीवरील व्याज होणार १०० टक्के माफ; परभणी मनपाचा निर्णय
- कर्णधार कोहलीच्या ‘या’ निर्णयावर लक्ष्मणची नाराजी
- घरपट्टी व नळपट्टीवरील व्याज होणार १००% माफ; परभणी मनपाचा निर्णय
- विराट कोहलीचा मोठा पराक्रम! सचिन, धोनीला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान
- तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचे जोरदार पुनरागमन; भारताचा ८ गडी राखुन पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
