🕒 1 min read
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाचा ८ गडी राखुन दणदणीत पराभव करत जोरदार पुनरागमन केले आहे. या विजयानंतर ५ सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी बढत मिळवली आहे. मात्र एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने एक मोठा पराक्रम केला आहे.
तिसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. मात्र पहिल्या तीन फलंदाज ६ षटकांच्या आतच माघारी पतरले. मात्र नंतर विराटने कर्णधारपदाला साजेशी अशी आक्रमक अर्धशतकी खेळी केली. विराटने पहिले रिषभ पंत बरोबर ४० आणि नंतर हार्दिक पंड्यासह ७० धावांची भागीदारी रचली. कोहलीने ४६ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७७ धावांची खेळी केली.
नाबाद अर्धशतकाच्या जोरावर विराट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा नाबाद ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. आतापर्यंत विराटने ५० वेळा नाबाद राहात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. या आधी सचिन तेडुंलकरने ४९ वेळा नाबाद राहात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. त्याच्यापाठोपाठ महेंद्रसिंह धोनी अर्धशतक करत ४८ वेळा नाबाद राहिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचे जोरदार पुनरागमन; भारताचा ८ गडी राखुन पराभव
- मोठी बातमी : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन
- स्वारातीम’ विद्यापीठाच्या अर्थसंकल्पास अधिसभेची मंजुरी
- शेतकर्यांचे पैसे खाणार्यांना निवडून देणार का? : भाऊसाहेब पाटील चिकटगावकर
- आण्णा नाईक परत येत आहे! मालिकेचा प्रोमो सोशल मिडीयावर व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
