🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील ढाकेफळ गावात नारीशक्तीचा प्रभाव दिसून आलाय. ढाकेफळ गावातील 9 पैकी 9 जागांवर फक्त महिलाच विजयी झाल्या आहेत. गावकऱ्यांनी निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणात संधी दिली होती. त्याचा परिणाम म्हणुन हा विक्रम पहायला मिळाला आहे.
तर सिल्लोड तालुक्यातील लिहा खेडी येथील ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली असून नऊपैकी सात जागांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजय मिळविला आहे. यात विजयी उमेदवार अनिता नामदेव साखळे, कृष्णा समाधान साखळे, अर्चना पोपट साखळे, कविता सिताराम गोरे, रुपेश माणिकलाल जयस्वाल, सुभद्रा गजानन जाधव, पूजा प्रकाश साखळे, यापूर्वीच बिनविरोध झालेल्या प्रियांका मनोज साखळे या8 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेत. तर विरोधी रेणुका गजानन बावस्कर या विजयी झाल्यात.
दरम्यान, कन्नडमध्ये शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. भाजपच्या नितीन पाटील यांच्या पॅनलचा 15 पैकी 8 जागांवर विजय झाला आहे तर शिवसेनेला केवळ 4 जागा जिंकण्यात यश मिळवलं आहे.
हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलने सातही जागांवर विजय मिळवलेला आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्मिथच्या कृत्यानंतर आता रोहितचे कृत्य आले चर्चत
- शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलचा दारूण पराभव
- पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ
- कसं जनता म्हणेल तसं! विखे पाटलांच्या २० वर्षाच्या सत्तेला सुरुंग
- ‘या’ तारखेस चित्रपटगृहात रिलीज होणार शाहिदचा ‘जर्शी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
