🕒 1 min read
नागपूर: भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे. सत्तेचे लचके तोडण्यासाठी महाविकास आघाडी तयार तसे नाही झाले तर एकमेकांचे लचके तोड अशी महाविकास आघाडीची अवस्था झाली आहे. प्रत्येकजण सरदार असल्यासारखा वागत आहे. अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही पक्ष आंदोलन करुन राजकारण करत असल्याची टीका केली होती. यावरच त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगण्यापेक्षा सोबतच्या मंत्र्यांना अगोदर बोलयचं शिकवावं’ अशी टीका केली आहे. अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण करोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचं आहे. असं व्हायला नको. असे वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरेंनी केले होते. यावरच देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
यावेळी त्यांनी करुणा शर्मा पिस्तूल प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली आहे. त्या ठिकाणी जे काही घडलं आहे त्यावरुन कायदा-सुव्यवस्था कशी राखली जात आहे हे स्पष्ट होत आहे. जे आरोप प्रत्युत्तर होत आहेत आणि मिळालेलं पिस्तूल हे गंभीर असून यासंदर्भात कोणत्याही दबाबाशिवाय चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मनी हाईस्ट’मधील ‘या’ भूमिकेत पंकज त्रिपाठीला पाहून चाहते भडकले
- ‘गरीबांची मुले शिकली, मोठी झाली, उच्च विद्या विभूषित झाली तरच त्यांचे जीवनमान उंचावेल’
- अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढणार; ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला


