Share

‘महाविकास आघाडी सरकार म्हणजे दात पडलेले वाघ’

Published On: 

औरंगाबाद : मनसेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी जोरात कामाला सुवत करत, महाविकास आघाडी सरकारला दात पडलेल्या वाघाची उपमा दिली. शेतकऱ्यांसाठी महावितरणच्या आंदोलनात सरकारवर हल्ला बोल केला. त्यामुळे आगामी काळात मनसे जोर धरत पक्ष भक्कम करणार असल्याची चर्चा कार्यकर्ते करत आहे.

महावितरण कार्यालयासमोर वीजबील वसुलीसाठी शेतकऱ्यांचा शेतीपंपाचा विद्युत पुरवठा तत्काळ सुरू करावा आदी मागण्यांसाठी उपकेंद्रावर आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी उपक्रेंद्रात प्रवेश केला, परंतु वीरगाव पोलिसांनी त्यांना अडविले.

आठ दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन उपकार्यकारी अभियंता राहुल बडवे यांनी दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी  नंदु हिरडे,  सरपंच संतोष घंगाळे, स्वप्निल श्रीवास्तव, संदीप वाळूंज, गणेश बर्हाळकर,गोरक तुपे, मनोज लेभे, अशोक चव्हाण, योगेश तुपे, पोपट रक्ताटे आदी उपस्थित होते. वीरगाव पोलिस यावेळी बंदोबस्त देत महावितरण कार्यालयात उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!