मुंबई : राज्यासमोर सध्या भारनियमनाचं मोठं संकट आ वासून उभा आहे. कारण वीजनिर्मिती केंद्रात कोळसा टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. केवळ दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याची माहिती उर्जा विभागाने दिली आहे. राज्यात भारनियमाचं संकट टाळण्यासाठी कोस्टल गुजरात पावर लिमिटेड कंपनीकडून ७६० मेगावॅट वीज खरेदी खरण्याचा महत्वपूर्ण निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला आहे.
अल्पकालीन वीज खरेदी कराराद्वारे आगामी १५ जुनपर्यंत ही वीज खरेदी करण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. राज्यात वीज टंचाई असली तरी, वीज खरेदी करून राज्याला कोणत्याही परिस्थितीत वीज टंचाई होऊ देणार नाही. अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
आता यामुळे राज्यात वीज टंचाई निर्माण होते की त्यावर प्रभावीपाने उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
“मंदीत संधी शोधणारी माणसं”; चाकणकरांची चित्रा वाघ यांच्यावर टीका
IPL 2022 : दुसऱ्या विजयानंतर हैदराबादला बसला धक्का; पुढच्या दोन सामन्यांसाठी संघाबाहेर होणार ‘हा’ खेळाडू?
महिला आयएएस अधिकारी बांधणार ५६ व्या वर्षी लग्नगाठ
“चित्रा वाघ यांनी मला आत्महत्येचं पत्र…”; कुचिक प्रकरणातील पिडीतेचा गंभीर आरोप
संजय दत्तने आलिया भट आणि रणबीर कपूरला लग्नावरून दिले ‘हे’ सल्ले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

