Share

“बैठकीला उपस्थित न राहिल्यास…” ; शिवसेनेचा बंडखोर आमदारांना आदेश!

Published On: 

मुंबई : उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सरकारच्या राजकीय पेचप्रसंगावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( शिवसेना ) शिवसेनेचे आठ मंत्री उपस्थित राहिले नाहीत. त्याचवेळी शिवसेनेने सर्व आमदारांना आज सायंकाळी बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. त्यामध्ये बंडखोर आमदारांना असेही निर्देश देण्यात आले आहेत की, तुम्ही या बैठकीला उपस्थित न राहिल्यास तुम्हाला पक्ष तोडायचा आहे, असे मानले जाईल आणि तुमचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते.

त्याचवेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत दिले आहेत. संजय राऊत यांनी ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती विधानसभा बरखास्त करण्याकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे ठाकरे लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतात, असे मानले जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना महाराष्ट्राच्या आमदारांनी आसामची राजधानी गुवाहाटी येथे तळ ठोकल्याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काझीरंगा हे पर्यटनासाठी चांगले ठिकाण आहे. तिथेही चांगला पाऊस पडतोय. ज्यांना निसर्ग बघायचा आहे ते तिथे जाऊ शकतात.

प्रत्यक्षात शिवसेना 15, राष्ट्रवादी 53, काँग्रेस 44, इतर 16 असे फक्त 128 आमदार महाविकास आघाडी सरकारकडे उरले आहेत. म्हणजेच उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात येऊ शकते. दुसरीकडे भाजपकडे 106, एकनाथ शिंदे गट 40 आणि इतर 13 असे मिळून आता भाजप प्लससह एकूण 159 आमदार असतील. म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाला पाठिंबा दिल्यास महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!