Share

“गोव्यात फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न; रश्मी शुक्ला कोण?”, संजय राऊतांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप असून त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चु कडू, आशिष देशमुख व संजय काकडे यांचे तब्बल साठ दिवस फोन टॅप केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. असे असतांनाच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोव्यातदेखील फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न सुरु असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. तसेच गोव्यातील रश्मी शुक्ला कोण?, असा सवालही राऊतांनी केला आहे.

यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘गोव्यात फोन टॅपिंग चा महाराष्ट्र पॅटर्न. सुदिन ढवळीकर,विजय सरदेसाई, दिगंबर कामत, गिरीश चोडणकर यांचे फोन टॅपिंग सुरू आहे.’ तसेच गोव्यातील रश्मी शुक्ला कोण?, असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप असून यासंदर्भात तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नाना पटोले, बच्चु कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडे यांचे साठ दिवस फोन टॅप केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!