Share

“काय मुख्यमंत्री मिळालाय महाराष्ट्राला असंख्य महत्त्वाचे प्रश्न सोडून…”, निलेश राणेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील भाजपच्या दोन-चार नेत्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय आपल्याविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाया थांबणार नाहीत. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळातील भाजपच्या खात्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढण्याचे   मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांना सांगितल्याची माहिती मिळत आहे. यावरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“काय मुख्यमंत्री मिळालाय महाराष्ट्राला. महाराष्ट्राचे असंख्य महत्त्वाचे प्रश्न सोडून मागच्या ५ वर्षाचे ट्रॅक रेकॉर्ड शोधून काढायचं काम मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलं गेलं. मेहुण्यासाठी इतकं प्रेम की नवीन कामकाज म्हणून भाजपच्या मागे लागा असं मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं.”, असा टोला निलेश राणे यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान ईडीने पुष्पक ग्रुपच्या (ED action taken against Pushpak Group) ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर  (Sridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे. यावरच राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भातच काल मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक झाली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!