Share

पुन्हा रंगणार ‘कसोटीचे’ महाभारत, वाचा कसा ठरणार विश्वविजेता !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जुन महिन्यात भारत आणि न्युझीलंड संघात जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारताचा न्युझीलंडने ८ गडी राखुन पराभव केला. यासह न्युझीलंडने पहिल्यावहिल्या डब्ल्युटीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

यादरम्यान बुधवारी १४ जुलै रोजी आयसीसीने ट्विट करत डब्ल्युटीसी स्पर्धेच्या नवीन वेळापत्रकाची घोषणा केली. डब्ल्युटीसी स्पर्धेत यापुर्वी असलेल्या स्वरुपानुसार घरच्या मैदानावर तीन मालिका आणि परदेशात तीन मालिका हीच पद्धत कायम ठेवली आहे. मात्र यावेळी पॉईटंस् सिस्टीममध्ये बदल करण्यात आला आहे. एखादा संघाने जर सामन्यात विजय मिळवला तर १२ गुण मीळतील, जर सामना टाय झाला तर ६ गुण मिळतील आणि जर अनिर्णीत राहिला तर ४ गुण पण सामना गमावला तर मात्र एकही गुण मिळणार नाही.

तर कसोटी मालिकेनुसार गुणांची विभागणी केली आहे. मालिकेत जर दोन सामने असतील तर २४, तीन असतील तर ३६, जर ४ सामने असतील तर ४८ आणि ५ सामने असतील तर ६० गुण मिळतील. मात्र या स्पर्धेची क्रमवारी ही गुणावरुन नाही तर याच गुणावरुन काढलेल्या टक्केवारीवर अवलंबुन असणार आहे. १२ गुण असतील तर १०० टक्के, ६ गुण असतील तर ५०टक्के आणि ४ गुण असतील तर ३३.३३टक्के मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!