Share

Maharashtra Rain Updates | राज्यभरात पावसाचा जोर कमी, मराठवाड्यासह विदर्भात ‘यलो अलर्ट’!

Published On: 

🕒 1 min read

गणेशविसर्जनानंतर राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र आज या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या मते, राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईसह ठाणे शहरात जोरदार पाऊस झाला. यासोबतच पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे. काही ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. दरम्यान आज (20 सप्टेंबर) विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सोलापूरमध्येही पावसाचा यलो अलर्ट आहे. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत  देखील झाले होते. याचा वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!