🕒 1 min read
सोलापूर : ‘सचिन वाझेवर झालेल्या कारवाईत पाच अधिकारी निलंबित झालेत. परमबीर सिंग घरी गेले, अनिल देशमुखांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. आता अवैध बांधकाम प्रकरणी सध्या अनिल परबांवर कारवाई सुरूये. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर असेल’ असा दावा भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला. भाजप ठाकरे सरकारमधला भ्रष्टाचार पूर्णपणे बाहेर काढेल, असंही ते म्हणाले.
सोमैय्या यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मंत्र्यांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सरकारमधल्या विविध मंत्री आणि शिवसेनेच्या नेत्यांवर यावेळी सोमय्या यांनी गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यातील सरकारनं खुशाल पाच वर्षे पूर्ण करावी. पण मंत्री आणि नेत्यांकडून होणारे भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम आपण करणार असल्याचे सोमैय्या यांनी सांगितले.
शिवसेना नेते संजय राऊत यांना ५५ लाख रुपये परत करावे लागले आहेत. मुंबईच्या महापौरांनी एसआरए चे गाळे ढापल्याचे उच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. अनिल परब, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड आता रांगेत आहेत. त्यामुळं ‘आगे आगे देखो होता हैं क्या’ असे म्हणत सोमय्यांनी कारवाईचे संकेत दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- शाहू महाराज-बाबासाहेब एकत्र येऊ शकतात, मग प्रकाश आंबेडकर आणि मी का नाही?-खा.संभाजीराजे
- ‘मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास केला’
- ‘क्या हुआ तेरा वादा?’, चित्रा वाघ यांच्याकडून जयंत पाटलांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
- ‘संभाजीराजेंची अवहेलना भाजपच्या अंगाशी येणार’, शिवसेना खासदाराचा इशारा
- ‘ठाकरे सरकारने जनगणना करून ओबीसींना पूर्ववत आरक्षण द्यावे’, भाजप ओबीसी मोर्चाची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
