🕒 1 min read
औरंगाबाद : पाच दिवस पेट्रोलपंप बंद राहणार असल्याची अफवा शहरात पसरल्यानंतर नागरीकांनी पेट्रोल पंपावर सायंकाळी पाच वाजेनंतर रांगा लावल्याचे बघावयास मिळाले. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळामध्ये अत्यावश्यक वाहतुक करणाऱ्यांनाच पेट्रोल देण्यात येणार आहे. अन्य दिवशी पंप सुरळीत राहणार असल्याचे पेट्रोलपंप चालकांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी अंशता लॉकडाऊन काळात रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहे. शनिवारी व रविवारी असलेल्या लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरीकांनाच पेट्रोल द्यावे अशा सूचना पंप चालकांना देण्यात आल्या आहेत.
परंतु, पाच दिवस सर्वच पेट्रोल पंप बंद असणार असल्याची अफवा शहरात पसरली. या अफवेनंतर नागरीकांनी पंपावर रांगा लावल्याचे दिसून आले. अनेकांनी गाड्यांच्या टाक्या फुल करून ठेवल्या. दरम्यान, अफवेवर विश्वास ठेऊ नये. दोन दिवस केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरीकांना पेट्रोल देण्यात येणार आहे. उर्वरित दिवशी पंप सुरूच राहणार असल्याचे पंप चालकांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- धोक्याची घंटा! घाटीत आज २१ कोरोनाबाधितांचा मृत्यू
- महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने, राज्यात 28 तारखेपासून रात्रीची कडक जमावबंदी…
- दिपाली चव्हाण प्रकरणी ‘त्या’ अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करा ; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात खाटाच्या माहितीसाठी कोविड -19 चौकशी कक्ष सुरु
- बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात मीही सहभागी होतो – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
