Share

भागवत ऐकल्याने केवळ कानच नव्हे तर अंतर्मन सुद्धा शुद्ध होते – नवनीत राणा

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : भागवत कथा ही मनुष्य जीवनाचा सार आहे. भागवत ऐकल्याने केवळ कानच नव्हे तर अंतर्मन सुद्धा शुद्ध होते. असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. त्यांनी सुप्रसिद्ध कथावचिका व प्रवचनकार सुश्री रामप्रियाजी यांच्या प्रवचनासाठी हरिद्वार येथे भावीकांना घेऊन जाणाऱ्या गोंडवाना एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

हरिद्वार येथील प्रवचनाच्या कार्यक्रमासाठी दरवर्षी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक या आश्रमात जातात. यंदाही अमरावती जिल्ह्यातून शेकडो भाविक रवाना झाले आहेत. खासदार नवनित राणा यांनी या भाविकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, त्यानंतर गोंडवाना एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

याबाबत खासदार नवनीत राणा यांनी ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये म्हणतात, भागवत कथा ही मनुष्य जीवनाचा सार आहे. भागवत ऐकल्याने केवळ कानच नव्हे तर अंतर्मन सुद्धा शुद्ध होते. सुप्रसिद्ध कथावचिका व प्रवचनकार सुश्री रामप्रियाजी यांच्या प्रवचनासाठी हरिद्वार येथे शेकडो भक्तांना घेऊन जाणाऱ्या गोंडवाना एक्सप्रेस ला हिरवी झेंडी दाखवून केले रवाना.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!